Mahalaxmi yatra

Mahalaxmi yatra

ayush - adivasi yuva shakti







नमस्कार मित्रानो....

आम्ही आयुष च्या ऑनलाइन केंद्र वरुण बोलत आहोत...
आयुष - आदिवासी युवा शक्ति

आज आयुष तर्फे डहाणू येथे व्यवसाय मार्गदर्शन चा कार्यक्रम आयोजित केला आहे.. त्यात आपल्या समाजातील प्रतिष्टीत आणि विविध चांगल्या पदावर असलेले मान्यवर आपल्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतील.
तरी आपण सगळ्यांनी उपस्तीत राहून हा कार्यक्रम यशस्वी अक्रण्यास सहाय करावे......आणि आपल्या मित्रांना पण कालवा जेणेकरून ह्या कार्याक्रमचा लाभ जास्त जाणा पर्यंत पोहचेल...

कार्यक्रमाचे तपशील -
व्यवसाय मार्गदर्शन शिबीर
ठिकाण - डहाणू पंचायत समिती सभाग्रह
दिनांक - २८ जून २००९
वेळ - सकाळी १० ते सायंकाळी ५


आजच्या कार्यक्रमाच्या तपशील साठी संपर्क
डॉ. सुनील पर्हाड (doctor, REL)  -09860383632
वसंत भासरा (social worker, TISS)-09422675887
विराज गडग (student)- ०९२२४३२४६१४

आपल्या सहकार्याच्या अपेक्षेत
 

-आयुष मंच


**********************************************************************************************************************************************************************************************

तारपा बोकुड धान आया जागरण ढोल बयिल बंडी कनसरि मांग्तेरा कोड्या गौरी ढोर सलाता पंगत विद्या धवलेरी दिवा कामड माजर जवुल दूर आंधान भगत पणती नाच पडाल उडवी भुताली सरन टिपरया दिस पूर सूप पुस्तक मण्डली मयत धुमश्या निम्बर भोतड जेवण वाडाय कोकत्रि ढोलकी आग आगोठ उखल   डोसली पेरण उजेड मुसल लगीन भिंडोडोत वखत पायली वरात भाकर चीचोनी आंबील पेज तांब्या जातां ताडी बोंबील अम्बोसी ठेसा कोलींब adivasiyuva shakti
 
 मी बेस आहू.. तू बेस रेहे....     कव्हा येव घरा असा झालाहे...     करमं नाय....     हलू हलू जा निही त पडशील..     मी त अथाचाच र....     आपले सगले एकूच आहुत     होली खेलाया ये दादू...     आठवा नोकों काढू हाव     आपली संकृति अपल्याना फ़क्त सनग्राहलायत ठेवायची नाहीये ...     आपले लोकांना विसरजोस नोको हाव ...     कोन्हाला माझा आठव येत होवा का निही...     आपली संस्कृति आपली अस्मिता     क्या बिहेतोस?, बिहू नोको ना........     आपली माती आपली मानसे आपलाच आवाज. ....     अथ नाचू का कोठं नाचू?     माना आठव येय घराचा....     ज्या शिकातोस त्या रोजचे अयुषात वपरीत जा हाव काय?     क्या लाजतोस आपली भाषा बोलाया     आलसय आली हे...     आपले लोकाना विसरु नोकोस   कव्हा येव घरा असा झालाहे... आपली संकृति अपल्याना फ़क्त सनग्राहलायत ठेवायची नाहीये ... आठवा नोकों काढू हाव मी बेस आहू.. तू बेस रेहे.... होली खेलाया ये दादू... क्या लाजतोस आपली भाषा बोलाया आपली संस्कृति आपली अस्मिता आपले लोकाना विसरु नोकोस क्या बिहेतोस?, बिहू नोको ना........ आपले लोकांना विसरजोस नोको हाव ... आपली माती आपली मानसे आपलाच आवाज. .... हलू हलू जा निही त पडशील.. करमं नाय.... आपले सगले एकूच आहुत माना आठव येय घराचा.... आलसय आली हे... मी त अथाचाच र.... अथ नाचू का कोठं नाचू? ज्या शिकातोस त्या रोजचे अयुषात वपरीत जा हाव काय? कोन्हाला माझा आठव येत होवा का निही... तारपा बोकुड धान आया जागरण ढोल बयिल बंडी कनसरि मांग्तेरा कोड्या गौरी ढोर सलाता पंगत विद्या धवलेरी दिवा कामड माजर जवुल दूर आंधान भगत पणती नाच पडाल उडवी भुताली सरन टिपरया दिस पूर सूप पुस्तक मण्डली मयत धुमश्या निम्बर भोतड जेवण वाडाय कोकत्रि ढोलकी आग आगोठ उखल   डोसली पेरण उजेड मुसल लगीन भिंडोडोत वखत पायली वरात भाकर चीचोनी आंबील पेज तांब्या जातां ताडी बोंबील अम्बोसी ठेसा कोलींब adivasiyuva shakti **********************************************************************************************************************************************************************************************








--
तारपा बोकुड धान आया जागरण ढोल बयिल बंडी कनसरि मांग्तेरा कोड्या गौरी ढोर सलाता पंगत विद्या धवलेरी दिवा कामड माजर जवुल दूर आंधान भगत पणती नाच पडाल उडवी भुताली सरन टिपरया दिस पूर सूप पुस्तक मण्डली मयत धुमश्या निम्बर भोतड जेवण वाडाय कोकत्रि ढोलकी आग आगोठ उखल निही   डोसली पेरण उजेड मुसल लगीन भिंडोडोत वखत पायली वरात भाकर चीचोनी आंबील पेज तांब्या जातां ताडी बोंबील अम्बोसी ठेसा कोलींब adivasiyuva shakti





ayush program @ dahanu, career guidence june 2009

hi friends....

aaj "ayush" che "career guidence" sathi Dahanu yethe prograam aahe....
venue - dahanu panchayat samiti hall.
date - 28 jun 09
time 10am to 5 pm

please attend same & inform to all your frds.

rgrds

विभाजन केव्हा?

मुंबई नावाच्या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या व्यापारी बेटाच्या कवेत, अवघ्या ४० किमी अंतरावर वसलेल्या ठाणे जिल्ह्याचा
विकास झाला आहे का, असा सवाल केल्यास शहरी भागातली मंडळी माना डोलावतील. मात्र, हा जिल्हा किती मागासलेला आहे याचे विदारक चित्र जिल्ह्यातील खेडी आणि अदिवासीपाड्यांवर दिसते. खऱ्या अर्थाने विकास साधायचा असेल तर जिल्ह्याचे विभाजन करणे अत्यावश्यक असल्याचे वारंवार सांगितले जाते. निवडणुका आल्या की जिल्हा विभाजनाचे पडघमही वाजू लागतात. मात्र, गेल्या १० वर्षात अनेक आंदोलने, उपोषणे, मोर्चे निघाले तरी ही मागणी मार्गी लागलेली नाही. जिल्हा विभाजनाच्या प्रश्नावर संदीप शिंदे यांनी टाकलेला हा दृष्टिक्षेप.

.........

जिल्ह्यातील प्रशासकीय रचना

महाराष्ट्र राज्य सहा विभागांमध्ये विभागलेले असून त्यातील कोकण विभागात ठाणे जिल्ह्याचा समावेश होतो. वसई, पालघर, डहाणू, तलासरी, जव्हार, मोखाडा, भिवंडी, वाडा, शहापूर, मुरबाड, कल्याण आणि उल्हासनगर असे १३ तालुके जिल्ह्यात आहेत. जिल्हा स्तरावर कलेक्टर तर तालुका स्तरावर तहसिलदार प्रमुख आहेत. ठाणे जिल्हा परिषदेच्या माध्यमातून विकास साधण्यासाठी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखालील अधिकाऱ्यांची फौज तैनात आहे. तर, शहरांच्या विकासाची धुरा महापालिकांवर सोपविण्यात आली आहे.

विभाजन कशासाठी?

- सागरी, ग्रामीण आणि शहरी अशा तीन भागांमध्ये हा जिल्हा विभागलेला आहे. त्यामुळे जिल्ह्यातल्या मच्छिमारांचे प्रश्न वेगळे, अदिवासींच्या समस्या वेगळ्या आणि शहरी भागाच्या मागण्या वेगळ्या असतात. जिल्ह्यातल्या योजना ठरविताना त्याचा सारासार विचार झालेला दिसत नाही. त्यामुळे ग्रामीण भागामध्ये नेहमीच अन्याय झाल्याची भावना असते.

- जिल्ह्याचे मुख्यालय ठाणे शहरात असून वरिष्ठ अधिकाऱ्यांची आणि मुख्य सरकारी कार्यालये येथेच आहेत. कोणतेही छोटे मोठे काम असले तरी जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यात वसलेल्या जनतेला ठाणे शहरात धाव घ्यावी लागते. एका दिवसात काम झाले नाही तर पुन्हा हेलपाटे ठरलेले आहेतच. त्यात वेळ, पैसा आणि श्रम याचा अपव्यय होत असून गोरगरीब जनता हतबल झाली आहे.

* जिल्हा मुख्यालयापासून डहाणु १२५ किमी तर जव्हार १०० किमी अंतरावर आहे. वरिष्ठ सरकारी अधिकारी अभावानेच या भागांमधील गावांमध्ये जातात. वरिष्ठ अधिकारी कागदोपत्रीच इथला कारभार पाहतात. त्यामुळे स्थानिक अधिकारीदेखील अत्यंत बेजबाबदारपणे कारभार हाकतात. त्याचा विकासावर विपरीत परिणाम झाला आहे.

ठ्ठ जिल्ह्याचे विभाजन झाल्यानंतर नविन जिल्ह्यासाठी नवा कलेक्टर, नवे पोलिस अधिक्षक आणि सर्व शासकीय यंत्रणा उभारली जाते. त्यामुळे अधिकाऱ्यांच्या कामाचे विभाजन होऊन छोट्या भागाच्या विकास अधिक प्रभावीपणे करणे शक्य होईल.

* विभाजनानंतर दारिद्य रेषेखालील जनता आणि आदिवासींसाठी केंद आणि राज्य सरकारच्या शेकडो योजना त्या लोकांपर्यंत पोहोचविणे सुकर होणार आहे.

* जिल्ह्यातील ज्या भागातून रेल्वेमार्ग जातात त्या भोवतालच्या भागाचा विकास झाला आहे. मात्र, रेल्वेचे नेटवर्क नसलेला भाग मागासलेला आहे. डहाणू-नाशिक रेल्वे मार्ग झाल्यास या भागाचाही विकास होऊ शकतो. या रेल्वेमार्गास माजी खासदार चिंतामण वनगा यांनी लोकसभेतून मंजुरी मिळवली होती. मात्र, तांत्रिक अडचणींमुळे हे कामही सुरू झालेले नाही.

* ठाणे शहर, कल्याण, उल्हासनगर, भिवंडी, वसई या भागांमध्ये मोठ्या प्रमाणावर औद्योगिकीकरण झाले असून या भागातील १० एमआयडीसींमुळे हजारो लोकांना त्यात रोजगार उपलब्ध झाला आहे. केमिकल, ऑटोमोबाईल, फार्मा, प्लास्टिक, आणि कलर्स तयार करणाऱ्या कंपन्या या भागांमध्ये आहेत. जिल्ह्यात सुमारे ११ हजार लघु उद्योग तर १ हजार ५४८ मोठे उद्योग आहेत. जव्हार आणि वाडा येथे २ को-ऑप इंडस्ट्रिअल इस्टेट आणि काही कंपन्या आहेत. मात्र, तलासरी, मोखाडा, डहाणू, पालघर हा भाग औद्योगिकीकरणात मागासलेला असून नोकरीधंद्यासाठी इथल्या लोकांना आजही कित्येक कोस दूर यावे लागते.

कसे व्हावे जिल्ह्याचे विभाजन?

क्षेत्रफळानुसार देशातील दुसऱ्या क्रमांकाच्या ठाणे जिल्ह्याचे शहरी आणि ग्रामीण अशा दोन विभागात विभाजन करावे अशी मागणी आहे. जिल्ह्यातील सर्व महानगरपालिका आणि नगरपालिका म्हणजेच ठाणे, कल्याण-डोंबिवली, उल्हासनगर, भिवंडी, मीरा-भाईंदर, अंबरनाथ, बदलापूर, वसई, मुरबाड या भागांचा एक जिल्हा असावा. तर वाडा, शहापूर, विक्रमगड, जव्हार, मोखाडा, पालघर, डहाणु आणि तलासरी या मागास भागांचा दुसरा जिल्हा आसावा. शहरी, सागरी आणि डोंगरी अशा तीन जिल्ह्यांत ठाण्याचे विभाजन व्हावे अशीही काही मंडळींची मागणी आहे. कृषी मंत्री शरद पवार यांनीही दहा वर्षांपूवीर् ठाणे जिल्ह्याच्या विभाजनाची गरज व्यक्त केली होती.

अडथळे

* जिल्ह्याचे विभाजन करून सर्व शासकीय यंत्रणा उभारण्यासाठी किमान ३०० कोटी रुपयांचा निधी आवश्यक आहे. ठाण्याबरोबरत नागपूर आणि अहमदनगर जिल्ह्यांचेही विभाजन करावे अशी मागणी आहे. एका जिल्ह्याचे विभाजन केले की दुसऱ्या जिल्ह्यातील आंदोलने तीव्र होणार तसेच तिन्ही जिल्ह््यांच्या विभाजनाचा एकत्रित निर्णय घेतला तर सुमारे एक हजार कोटींचा निधी आणि अधिकाऱ्यांची फौज उभी करणे राज्य सरकारच्या आवाक्याबाहेरचे आहे. त्यामुळे विभाजनाचा प्रश्न चिघळला आहे.

* जिल्ह्याच्या विभाजन कराण्याचा विषय निघाला की नव्या जिल्ह्याचे मुख्यालय जव्हारला उभारायचे की डहाणुला याव रून वाद सुरू होतो.

* जिल्ह्याचे विभाजन व्हावे ही काळाची गरज आहे यावर एकमत असले तरी राजकीय नेत्यांची अनास्था विभाजनाच्या मागणीची तड लावू शकलेली नाही. केवळ निवडणुका तोंडावर आल्या की विभाजनासाठी आंदोलनाचे हत्यार उगारणारे राजकीय पक्ष या मागणीबाबत किती प्रामाणिक आहेत हा संशोधनाचा विषय आहे.

* या जिल्ह्यातून १३ आमदार आणि दोन खासदार निवडून जातात. मात्र, त्यांच्यातही या मागणीबाबत एकवाक्यता दिसत नाही.

.......

योजनांचा पैसा जातो कुठे?

ठाणे जिल्हा हा भौगोलिक आणि सामाजिक स्तर लक्षात घेता आदिवासी, ग्रामीण आणि शहरी अशा तीन स्तरांत विभागला गेला आहे. १५ तालुक्यांपैकी पालघर, डहाणू, तलासरी, जव्हार, मोखाडा, शहापूर, वाडा, विक्रमगड हे आठ आदिवासी तालुके म्हणुन ओळखले जातात. आदिवासींच्या विकासासाठी इथे दरवषीर् शंभर ते सव्वाशे कोटी रुपये खर्च केले जातात. मात्र, त्या अदिवासींच्या घरापर्यंत ना रस्ते पोहचले, ना वीज पोहचली ना पाणी. शिक्षण व्यवस्थेत सावळा गोंधळ असल्याने इथल्या अशिक्षित तरुणांना नोकऱ्या मिळत नाहीत. अदिवासी हा विकासाचा केंदबिंदू मानून जिल्हात तीनशेच्या आसपास योजना राबविल्या जातात. या योजनांच्या अमलबजावणीवर लक्ष ठेवण्यासाठी आदिवासी विभागाचे स्वतंत्र कार्यालय आहे. मात्र, विकासासाठी येणाऱ्या पैशातून हे कार्यालयच आपल्या पोतड्या भरत असून गोरगरीब जनता मात्र आजही पोटाची खळगी भरण्यासाठी वणवण करीत आहे.

दुर्गम भागांत 'ज्ञान'वैभव!



दहावीच्या परीक्षेत यंदा ठाणे जिल्ह्याच्या आदिवासी पट्ट्यातील अतिदुर्गम भागात असलेल्या ५९ सरकारी माध्यमिक आश्रम शाळांपैकी आठ शाळांचे निकाल १०० टक्के लागले आहेत. यामुळे शाळांमध्ये जल्लोषाचे वातावरण आहे.

पालघर, वाडा, मोखाडा, विक्रमगड, जव्हार, तलासरी, डहाणू तालुक्यांत २१६ माध्यामिक शाळा असून यात ५९ सरकारी आश्रमशाळांचा समावेश आहे. मोखाडा तालुक्यातील अडोशी, गोंडे बुदुक, कोरेगांव तसेच जव्हार येथील कुपोषित बालकांसाठी कुप्रसिद्ध असलेल्या वांगणी, विनवल, देहेरे तसेच, विक्रमगड येथील कोन्हे, वाडा तालुक्यातील एक अशा एकूण आठ सरकारी आश्रमशाळांनी १०० टक्के यश मिळविले आहे.

तीन-चार वषेर् या आश्रमशाळांत दहावीचे निकाल शून्य ते २० टक्केच लागत होते. त्यामुळे, कोट्यवधी रुपये खर्चून सरकार आदिवासी मुलांना शिक्षण देत असूनही त्याचा पुरेसा लाभ आदिवासींना मिळत नाही; केवळ कागदी घोडे नाचवले जातात, अशी ओरड होत होती. यंदा मात्र चित्र बदलले. केवळ पाच टक्के शाळांचा निकाल ५० टक्यांच्या खाली आला आहे. त्यातही डहाणू तालुक्यातील धामणगाव येथील आश्रम शाळेचा निकाल २२. ७२ टक्के व रानकोळ येथील आश्रमशाळेचा निकाल ३१.०३ टक्के इतकाच आहे.

इंग्रजी शाळांमध्ये केवळ उत्तीर्ण होणाऱ्या विद्याार्थ्यांनाच दहावीच्या परीक्षेला बसविले जाते. मात्र आश्रमशाळांमधील विद्यार्थ्यांवर अशी सक्ती केली जात नसतानाही आश्रमशाळांनी ही कामगिरी केल्याने या शाळांचे कौतुक होत आहे.
original at -http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/4703878.cms

करिअरच्या वेगळ्या वाटा



दहावीचा निकाल लागल्याने आता विद्याथीर् आणि पालकांपुढे असलेला प्रश्ान् म्हणजे कुठलं करिअर निवडायचं. ज्या विद्या
र्थ्यांना कमी मार्क मिळाले आहेत त्यांनी खचून जाऊ नये. कारण ग्लोबलायझेशनमुळे अनेक करिअर नव्याने उदयाला येत आहेत.

खरंतर या प्रश्ानवर विचार करायची ही योग्य वेळ नाही. झाड चांगलं वाढण्यासाठी लागवड केल्यापासूनच त्याची काळजी घेतली पाहिजे. म्हणूनच शालेय जीवनातच मुलाच्या करिअरचा विचार करायला पाहिजे.

मूल पाचवीत गेल्यानंतर त्याला कुठल्या विषयात रस आहे हे पालकांनी जाणून घ्यावं. दहावी मुलाच्या शैक्षणिक जीवनातला महत्त्वाचा टप्पा असतो. त्यानंतर खऱ्या अर्थाने करिअरची सुरुवात होते. म्हणून त्याआधी आपला मार्ग निश्चित करणं आवश्यक आहे.

आपल्या देशात १२० विद्यापीठं आहेत. त्यात चार हजारहून जास्त सीनिअर आणि ज्युनिअर कॉलेजेस आहेत. कमी गुण मिळूनही पॉलिटेक्निकला जाऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी वांदे (पू.) इथल्या खेरवाडीमधल्या र्गव्हन्मेण्ट पॉलिटेक्निक कॉलेज हा चांगला पर्याय आहे. बरेच पालक आपली इच्छा मुलांवर लादतात. प्रत्येक पालकाला आपलं मूल इंजिनिअर व्हावं असं वाटत असतं. पण ७० टक्क्यांपेक्षा कमी मार्क असलेल्या विद्यार्थ्यांनी इंजिनिअरिंगला प्रवेश घेऊ नये.

तंत्रज्ञान शाखेची आवड असणाऱ्यांसाठी कम्प्युटर हे क्षेत्र चांगलं आहे. या क्षेत्रात उत्तमोत्तम कोसेर्स आहेत. सध्याच्या काळात नोकरीच्या संधी दुमिर्ळ होत असल्यामुळे कमी टक्के मिळालेल्या विद्यार्थ्यांनी जॉब ओरिएण्टेड करिअर्सचा विचार करावा. मोबाइल रिपेअरिंगमध्येही चांगलं करिअर होऊ शकतं. याबरोबरीने टीव्ही, फ्रीज रिपेअरिंगचेही कोसेर्स चांगले आहेत. हे कोर्स केल्यावर तुम्ही स्वत:चा व्यवसाय करू शकता आणि चांगलं अर्थार्जन करू शकता. तसंच आयटीआयचे टेक्निकल कोसेर्सही करता येतील.

ग्रामीण भागातले किंवा शेतीची आवड असणारे विद्याथीर् शेतीमध्ये करिअर करू शकतात. त्यासाठी आज महाराष्ट्रात चांगली कॉलेजेस आहेत. पर्यावरणाची आवड असलेल्यांनी दहावीनंतर सायन्सला प्रवेश घ्यावा. त्यानंतर पाच वर्षं दापोली, राहुटी, परभणी आणि अकोला इथल्या कृषी विद्यापीठात शिक्षण घेता येईल. यात जमिनीची धूप कशी थांबवावी, तिचा कस वाढवणं यासारख्या गोष्टी शिकवल्या जातात. तुम्हाला पर्यावरणाचा एखादा विषय घेऊन रिसर्चही करता येतो.

ज्या विद्यार्थ्यांना कॉमर्समध्ये रस आहे त्यांच्यासाठी 'टॅक्सेशन आणि ऑडिट' हे दोन कोर्स उत्तम आहेत. मुंबईच्या गरवारे इन्स्टिट्यूटमध्ये 'टॅक्सेशन आणि ऑडिट'चे चांगले कोसेर्स आहेत. हे कोर्स विद्यार्थ्यांना नक्कीच फायदेशीर ठरू शकतील. प्रत्येक व्यवसायात ऑडिटची गरज भासते. त्यामुळे हा कोर्स पूर्ण केल्यावर नोकरीच्या भरपूर संधी उपलब्ध आहेत. याशिवाय हे विद्याथीर् स्वत:चा व्यवसायही करू शकतात. तसंच नोकरी करतानाच इन्कम टॅक्स भरणं, सोसायटी किंवा इतर आस्थापनांची अकाऊण्ट्स लिहिणं यासारखी खासगी कामंही करू शकतात. परंतु ही कामं करताना १२ वी नंतर तुम्हाला तीन वर्षांचा अनुभव किंवा बी.कॉम नंतर तीन वर्षांचा अनुभव असायला हवा. त्यामुळे टॅक्सेशनमध्ये चांगल्या संधी उपलब्ध आहेत.

ज्यांना आर्ट्स, कॉमर्स किंवा सायन्स अशा शाखांमध्ये फारसा रस नाही त्यांच्यासाठी टेलरिंग, फॅशन डिझायनिंग, फॅशन टेक्नॉलॉजी अशी वेगळी करिअर्सही खुली आहेत. तुमच्याकडे टॅलेण्ट असेल आणि मेहनत घ्यायची तयारी असेल तर या क्षेत्रात स्काय इज लिमिट! तुम्ही स्वत:चा व्यवसाय करू शकता किंवा चांगल्या बुटिकमध्ये नोकरीही करू शकता. सध्या या क्षेत्रांचे खासगी संस्थांचे सहा ते आठ महिन्यांचे विविध कोसेर्स उपलब्ध आहेत. यात तुम्हाला कापडाचा पोत ओळखणं, स्टिचिंग करणं, विणणं, डिझायनिंग करणं यासारख्या गोष्टी शिकायला मिळतात. जोडीला तुमची कल्पकता असल्यास या क्षेत्रात उत्तम यश मिळवता येईल.

जेमॉलॉजी हेही चांगलं करिअर म्हणून उदयाला येतंय. प्राचीन काळापासून माणसाला हिऱ्याचं, खड्याचं आकर्षण आहे. त्यामुळे जगभरात अनेक वर्षांर्पासून रत्नांचा व्यापार सुरू आहे. यामध्ये हिऱ्याला पैलू पाडण्याचा अत्यंत महत्त्वाचा आणि कौशल्याचा भाग असतो. दहावीनंतर या क्षेत्राची आवड असलेले विद्याथीर् हे कोसेर्स करू शकतात. त्याचा कालावधी साधारणत: सहा महिन्यांचा असतो.

ज्यांना मेडिकल किंवा इंजिनिअरिंगमध्ये आवड नाही ते विद्याथीर् जेनेटिक्स किंवा सायकोलॉजी घेऊन एम.एस्सी. करू शकतात. एम.एस्सी. क्लायमेट किंवा पर्यावरण यासारखे वेगळे पर्यायही उपलब्ध आहेत. तसंच तुम्हाला आवड असल्यास बोटीवर खलाशी म्हणूनही जाऊ शकता.

याखेरीज जाहिरात, कला, फोटोग्राफी, डिझायनिंग, कार डिझायनिंग, पत्रकारिता, कलाशाखा, इतिहास, भूगोल, मानसशास्त्र किंवा अर्थशास्त्र यासारखे करिअरचे वेगळे पर्याय आहेतच. ऑल द बेस्ट!

- किरण जोग
(लेखक करिअर कौन्सेलर आहेत)

काय म्हणतायत टॉपर्स?



दहावीच्या परीक्षेत खणखणीत यश मिळवलेल्या विद्यार्थ्यांवर कौतुकाचा वर्षाव होतो आहे! आयुष्यातील हा महत्त्वाचा टप्
पा ओलांडतानाचा त्यांच्या यशाचा फंडा आणि पुढच्या महत्त्वाकांक्षा, याविषयी त्यांच्याच शब्दांत...

* अॅरॉनॉटिकल इंजिनीअर व्हायचेय
९० टक्क्यांपेक्षा जास्त मार्क मिळतील, असे वाटत होतेच परंतु, मुंबईतून पहिला क्रमांक आल्यावर मात्र, आश्चर्याचा धक्का बसला आहे. या यशाचे मानकरी शिक्षक, आई-वडील आणि आजी आहे. मला चौथी आणि सातवीची स्कॉलरशीप, होमी भाभा सायन्स टॅलेन्ट हंट स्पधेर्तल्या ज्युनिअर्सच्या गटात सुवर्ण तर सिनिअर्सच्या गटात रौप्यपदक मिळाले आहे. अकरावीसाठी मी ठाण्याच्याच एम. एच. हायस्कूलला प्रवेश घेणार आहे. नंतर आयआयटीला अॅडमिशन घेऊन मला अॅरॉनॉटिकल इंजिनीअर व्हायचे आहे.
- सोनाली चव्हाण, (९६.४६ टक्के) सरस्वती सेकंडरी, ठाणे, मुंबई विभागातून पहिली

* ध्यास इंजिनीअरिंग, आयएएसचा
दहावीच्या परीक्षेचे टेंन्शन न घेता मी नियोजन करून अभ्यास केला. वर्षभर शाळेतील स्पर्धा आणि कार्यक्रमांमध्ये भाग घेत खूप मजा केली. शिक्षकांचे मार्गदर्शन, पालकांचा पाठिंबा आणि स्पेशल बॅचेसमुळे हे यश मिळाले. मला भरतनाट्यमची आवड आहे. मला मुलुंडच्या केळकर कॉलेजमध्ये प्रवेश घ्यायचा आहे. आयआयटीतून इंजिनीअर व्हायचे आहे. नंतर आयएएसही करायचे आहे.
- शेफाली माडदोळकर,(९६.३०) सरस्वती विद्यालय, ठाणे, मुंबई विभागातून दुसरी

* मेडिकलपेक्षा इंजिनीअरिंग आवडते
माझे वडील इलेक्ट्रिकल इंजिनीअर, तर आई आणि मोठा भाऊ इलेक्ट्रॉनिक्स इंजिनीअर त्यामुळे मलाही इंजिनीअर व्हायचे आहे. मला बायोलॉजी विषय आवडत नसल्याने मेडिकलला जाण्यापेक्षा कॉम्प्युटर इंजिनीअर व्हायला आवडेल. माझ्या यशाचे श्रेय शाळेतले शिक्षक, कुटुंबियांना द्यायला हवे. मला अभ्यासात रमायला आवडते, पण चित्रकला, हस्तकलेचेही वेड आहे. सातवीत स्कॉलरशीप मिळाली होती. काही महिन्यांपूवीर् शाळेकडून 'बेस्ट गर्ल' ट्रॉफी मिळाली. मला एम. एच. हायस्कूलला प्रवेश घ्यायचा आहे.
- तेजल प्रधान, (९६.१५) ए. जे. जोशी, ठाणे, मुंबई विभागातून तिसरी

* वेळापत्रक तंतोतंत पाळले
वर्षभर केलेल्या अभ्यासामुळे परीक्षेचे ओझे वाटले नाही. वडिलांनी तयार केलेले दिवसभराचे वेळापत्रक, खासगी ट्यूशनमध्ये घेतलेला सततचा सराव आणि शाळेतील शिक्षकांचे मागदर्शन या त्रिसुत्रीमुळे हे यश मिळाले. कंटाळा येऊ नये म्हणून दररोज वेळापत्रक बदलले जात होते. आता पुढे इंजिनीअरिंग करायचे आहे.
- मृण्मयी जाधव, (९६.१५) सुळे गुरूजी विद्यालय,
हिंदू कॉलनी, मुलींमध्ये तिसरी व शाळेत पहिली.

* यश अभ्यासावर ठरते, शाळेवर नाही!
दोन वर्षापूवीर् आम्ही कल्याणहून माहीमला आलो. दादर, माहीम भागांतील एकाही शाळेत प्रवेश न मिळाल्याने रात्रशाळेचा पर्याय निवडला. रात्रशाळेत चांगले शिक्षण मिळत नाही, हा समज पूर्णपणे चुकीचा आहे. शाळा चांगली किंवा वाईट नसते. आपण अभ्यास कसा करतो, यावर बरेच अवलंबून असते. संध्याकाळी सातला शाळा सुटल्यानंतर रात्री थोडा वेळ अभ्यास, पहाटेच्या वेळी तीन तास नियमित अभ्यास, असे माझे अभ्यासाचे वेळापत्रक होते. हायकोर्टात अॅडव्होकेट असलेल्या वडिलांची आणि रात्रशाळेतील शिक्षकांची साथ मिळाल्यामुळेच हे यश मिळवू शकले. मला कम्प्युटर इंजिनीअरिंग किंवा मेडिकलमध्ये करिअर करायचे आहे. चांगल्या कॉलेजला प्रवेश घेऊन आता सीईटी आणि बारावीच्या अभ्यासावर लक्ष केंदित करायचे आहे.
- सोनल सिंग, (८४.१५) कनोसा नाईट हायस्कूल, रात्रशाळेत राज्यातून पहिली

* स्वप्न आयआयटी इंजिनीअर होण्याचे
दहावीचा उगाचच बाऊ केला जातो. नियमित अभ्यासाबरोबर खेळालाही महत्त्व द्यावे. अभ्यासातील सातत्य मात्र कमी होऊ न दिल्यास यश तुमचेच आहे. मला वाचनाची आवड आहे. परीक्षेच्या काळात आई हॉस्पिटलमध्ये अॅडमिट होती. मी सुरुवातीला दोन-तीन तास अभ्यास करायचो, मात्र नंतर हा वेळ वाढवत गेलो व खेळाचा वेळ कमी करीत गेलो. खेळात कधी खंड पडू दिला नाही. मला आयआयटी इंजिनीअर व्हायचे आहे.
- संकेत पाटील, (९६.३०) सेंट अँथनी काँन्व्हेंट, वसई, मुंबई विभागातून दुसरा

* आता आयआयटी, मग आयएएस!
वर्षाच्या सुरुवातीपासूनच अभ्यासाचे नियोजन केले होते. सुरुवातीला एक दोन तास अभ्यास सुरू होता. मग, पाच-सहा तास आणि नंतर दहा ते बारा तास. क्रिकेट सामने पाहिले, पण टीव्हीमुळे डोळ्यांवर ताण पडू नये म्हणून मालिका आणि मनोरंजाचे सर्व कार्यक्रम बंद होते. मोटारींचे फोटो जमवण्याचा मला छंद आहे. या यशाचे सर्व श्रेय आई वडिल व कोचिंग क्लासला आहे. भविष्यात आयआयटीतून सिव्हिल इंजिनीअरिंग करून पुढे आयएएस व्हायचे आहे. खूप मेहनत करून फोटोतली रोल्सरॉइस फँटम विकत घेण्याचे स्वप्न आहे.
- नवनीत मेहरोल, (९४.६१) सुळे गुरुजी विद्यालय, अपंगांमध्ये पहिला.

* पप्पांचे स्वप्न साकार करायचेय
डोळ्यांत अश्ाू असतील तर पुढचा मार्ग नीट दिसत नाही. त्यामुळे अश्ाू पुसून आपल्या ध्येयावर लक्ष्य केंदित करावे, असे पप्पा नेहमी सांगत. दहशतवाद्यांशी लढताना पप्पा शहीद झाल्यानंतर या शिकवणीचे अनुकरण करणे खूप अवघड होते. त्यांचे स्वप्न साकारण्यासाठी मी अभ्यासावर लक्ष केंदित केले. दहावीतील हे यश वडिलांच्या त्या शिकवणीमुळेच शक्य झाले. आता डॉक्टर होऊन त्यांचे स्वप्न साकार करायचे आहे. सांत्वन करण्यासाठी घरी लोकांची सतत ये-जा होती. त्यामुळे शेजाऱ्यांच्या घरी बसून अभ्यास केला. आई आणि बहिणीसोबतच मला शाळेतील शिक्षकांचे पाठबळ मिळाले. हा आनंदाचा क्षण पाहायला पप्पा नाहीत, याची मात्र खंत वाटते.
- निवेदिता शशांक शिंदे, (८६) प्रभादेवी कॉन्व्हेंट र्गल्स हायस्कूल

* अभ्यास-आहाराचे वेळापत्रक सांभाळा
क्लास-शाळा-क्लास आणि रात्री उशिरापर्यंत अभ्यास, असे माझे वेळापत्रक होते. या वेळा सांभाळताना माझे आहार आणि झोपेकडे दुर्लक्ष झाल्याने परीक्षा महिन्याभरावर आली असताना सारखी झोप यायची. त्यामुळे अभ्यासात व्यत्यय यायचा. मग मी वेळापत्रक बदललेे. प्रिलिम्समध्ये ९४ टक्के मिळाले तेव्हाच ९५ टक्क्यांच्या पुढे जाण्याचा निश्चय केला होता. या यशात माझ्या खाण्याचे वेळापत्रक पाळणारी आई, अभ्यास करताना माझ्याबरोबर उशिरापर्यंत जागणारे बाबा, धाकटा भाऊ आणि शाळा-क्लासमधील शिक्षकांचा वाटा आहे. मी फक्त अभ्यास एके अभ्यास करायचे, बाकीच्या गोष्टी या सगळ्यांनी सांभाळल्या. शाळेतील एक व्हॉलीबॉलची मॅच सोडली तर मनोरंजनाच्या सगळ्या माध्यमांपासून स्वत:ला जाणीवपूर्वक दूर ठेवले होते. जानेवारीत शाळा बंद झाल्यानंतरचा अखंड दिवस क्लास आणि घरी अभ्यास करण्यातच जायचा.
- अंजली जाधव, (९५.८४), अ. भि. गोरेगावकर इंग्लिश स्कूल,
गोरेगाव, मुंबईत मागासवगीर्यातून प्रथम

y

congrats " priti ramchandra sutar "

hi friends.....

congrats for all studetnts who success in SSC & HSC exams..... & wish all for best career & future

one good news...

ms. " priti ramchandra sutar " from kardinal pimenta adivasi highschool varkhanda
secure 93.53% in SSC.

this is gr8 news for all..... we can show our ability to world in this way now onwards & we will compete without any limit.

wish her all the best priti for your career & future

jai adivasi shakti!

दहावीनंतर शाखानिवड

या ठिकाणी एक गोष्ट स्पष्टपणे समजून घेतली पाहिजे, की दहावीला मिळणारे गुण हे बरेचदा अभ्यासपद्धती आणि 'घोकमपट्टी' या तत्त्वाने मिळविलेले असतात. यामध्ये विषयाचे आकलन व आवड यांचा थेट संबंध असतोच असे नाही

दहावीचा निकाल २५ जूनला लागला आहे. आता विद्यार्थी व पालक या दोघांपुढे एक महत्त्वाचा प्रश्‍न उभा आहे, तो म्हणजे पुढे अभ्यास शाखा कोणती निवडावी? अनेकदा किती गुण मिळालेत यावर हा निर्णय ठरवला जातो. आजही ठोकताळ्याने ७०-७५ टक्‍क्‍यांवर गुण मिळाले, की विज्ञान वाणिज्य कॉमर्स शाखा-त्याच्यापेक्षा कमी गुण मिळाले, की कला शाखा अशा प्रकारे निवडप्रक्रिया होते. यामध्ये बरोबरीचे मित्र/मैत्रिणी कोठे जाणार, हासुद्धा महत्त्वाचा भाग होतो. अनेकदा समाज किंवा पालकांच्या दडपणामुळे ही निर्णय होतो. उदा. एखाद्या ८५ टक्के गुण मिळालेल्या विद्यार्थिनीने कला किंवा गृहविज्ञान अभ्यासक्रमाला जाण्याचा निर्णय घेतला तर तिला वेड्यात काढले जाते आणि इतके चांगले गुण आहेत तर विज्ञान किंवा वाणिज्यला जा, असं दडपण निर्माण केलं जातं. या ठिकाणी एक गोष्ट स्पष्टपणे समजून घेतली पाहिजे, की दहावीला मिळणारे गुण हे बरेचदा अभ्यासपद्धती आणि "घोकमपट्टी' या तत्त्वाने मिळविलेले

we are speeding in to action, need your help.....???? ?? ???? ????, ....

hi....

hope you are doing well...

we are speeding in to action, need your help.....


आपल्या समाजात बरेच जण हुशार आहेत तुझ्या सारखेच,
पण सगळ्यानांच संधी नाही मिळत, कुणाला मार्गदर्शन नाही मिळत, कुणाला पैसे नसतात तर कुणाला सहानुभूती....

आणि आपल्या सारखेच आता बरेच चांगल्या स्थितीत आहेत, जे ठरवले तर काहीही करू शकतात, जर आपले रोजचे आयुष disturb न होऊ जर काही करायचे ठरवले तर.....
आपण सागळे मिळून जर गरजूंना मदत करायचे ठरवले तर खूप काही करू शकतो आपण...
आपल्या कडले बरेच जण चांगल्या ठिकाणी आहेत ज्यांना आपल्या समजा साठी काही करायचे आहे, अशा सगळ्यांना एकत्र आणून काही करायचे ठरवले आहे...
त्या साठी बरयाच community/blogs बनवले आहेत जेणे करून कुठे हि असलेले आपली माणसे एकत्र आणता येतील....

blog - http://adivasiyuva.blogspot.com/

orkut community - 1. adivasi (http://www.orkut.com/Main#Community.aspx?cmm=23631641)

2. adivasi yuva shakti (http://www.orkut.com/Main#Community.aspx?cmm=26988276)


त्यावर आपल्यांना प्रत्येकाचे मत एकूण घेता येयील. तरी आपले मत कळवा जेणेकरून आपण तसे विचार करून आपला मार्ग निवडू शकुत..
तर आपले मत जरूर कळवा,

आपल्या अभिप्रायाच्या प्रतिक्षेत

please forward this mail to all tribals.

- ek adivasi



********************************************************************



apale aankhin kahi blogs aani communities....

blogs

kasa - http://kendrakasa.blogspot.com/

mahalaxami - http://aayimahalaxmi.blogspot.com/

dahanu darshan - http://dahanudrashan.blogspot.com/

warli art - http://warlipainting.blogspot.com/

aaba - http://madhavraokane.blogspot.com/

talasari - http://vkk-talasari.blogspot.com/

ayush - http://adivasiyuva.blogspot.com/

dahanu engineers & doctors http://dahanu-engineer-doctor.blogspot.com/

ashram shala http://ashram-shala.blogspot.com/

orkut communities-

warli - http://www.orkut.com/Main#Community.aspx?cmm=18870374

dahanu darshan - http://www.orkut.com/Main#Community.aspx?cmm=23990434

talasari - http://www.orkut.com/Main#Community.aspx?cmm=23610297

adivasi - http://www.orkut.com/Main#Community.aspx?cmm=23631641

kasa - http://www.orkut.com/Main#Community.aspx?cmm=24420660

ayush - http://www.orkut.com/Main#Community.aspx?cmm=26988276

adivasi engnieers & doctors - http://www.orkut.com/Main#Community.aspx?cmm=20561491

jawhar - http://www.orkut.com/Main#Community.aspx?cmm=37822005

itdp dahanu - http://www.orkut.com/Main#Community.aspx?cmm=59756166

thankkarbappa vidyalay talasari - http://www.orkut.com/Main#Community.aspx?cmm=23948787

dahanu calling - http://www.orkut.com/Main#Community.aspx?cmm=42086944


marathi aani mumbai





































नवसू वळवी यांना डॉ. हेडगेवार पुरस्कार






राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संस्थापक डॉ. केशव बळीराम हेडगेवार यांच्या जन्मशताब्दी निमित्ताने १९८९ मध्ये देशभरात सर्वत्र सेवा निधीचं संकलन करण्यात आले होते. या निधीद्वारे महाराष्ट्रात ६७५ सेवा प्रकल्प पुरस्कृत करण्यात आले आहेत. सेवा कार्यात आपलं आयुष्य वेचणाऱ्या व्यक्तींना या निधीतून डॉ. हेडगेवार सेवा पुरस्कार देण्यात येतो. या वषीर्चा पुरस्कार देवबांध येथील सह्यादी आदिवासी बहुविध सेवा संघाचे संस्थापक नवसू महादू वळवी यांना दिला जाणार आहे.

वनवासी सेवा आणि वनौषधी संवर्धन या क्षेत्रात त्यांनी केलेल्या कार्यासाठी त्यांना हा पुरस्कार दिला जाणार आहे. हा पुरस्कार सोहळा रविवारी सकाळी १० वाजता कल्याण येथील आचार्य अत्रे रंगमंदिरात पार पडेल. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कल्याणमधील प्रसिद्ध आकिर्टेक्ट दिलीप दळवी असतील. चाइल्ड स्पेशालिस्ट डॉ. रामदास मराड यावेळी प्रमख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. संघाच्या पश्चिम महाराष्ट्र प्रांताचे सहसंघचालक अनिरुद्ध देशपांडे यांचे मोलाचे विचार ऐकण्याची संधी या कार्यक्रमाच्या निमित्ताने चालून आल्याची माहिती डॉ. हेडगेवार स्मारक सेवा निधीचे अध्यक्ष बापूराव मोकाशी यांनी दिली.


--

ओम भवती भिक्षांदेही !

ओम भवती भिक्षांदेही !

भारताचा चेहरा जगासमोर कसा आहे ? हे घरबसल्या जाणून घेण्याचे इंटरनेट हे एक सोपे माध्यम. वेगवेगळ्या वेबसाईटवर दिलेल्या माहितून भारत कसा आहे किंवा विभिन्न क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांच्या निरक्षणातून भारताचे वर्णन व्यक्तिगत ब्लॉगमध्ये कशाप्रकारे नोंदले आहे ? हे जाणून घेण्याचा प्रयत्न भारताविषयी अनोखी माहिती समोर आणतो. आपलाच देश आपल्याला अनोळखी वाटू लागतो. मात्र, भिकारी- भिखारी आणि बेगर्स यांच्याविषयी इंटरनेटवर माहिती शोधत असताना "भारत हा भिकाऱ्यांचा देश आहे आणि तेथे भिकाऱ्यांपासून सावध राहण्यासाठी पुढील टिप्स लभात ठेवा' असे जेव्हा वाचनात आले, तेव्हा अस्वस्थ झालो. त्याच मनःस्थितीत नोंदलेल्या इतरही माहितीचा या "दखल' मध्ये उहापोह...

जळगावचे प्राध्यापक डॉ. सुनील मायी यांचे "आलो जन्मभरी मागाया' हे छोटेखानी पुस्तक साधारणतः सहा महिन्यांपूर्वी वाचनात आले. भिकाऱ्यांच्या विषयी त्यांनी केलेल्या निरीक्षणांची नोंद त्यात आहे. भिकाऱ्यांचे तीन- चार इरसाल कॅरेक्‍टर लेखकाने उभे केले असून, सार्वजनिक ठिकाणी आढळणाऱ्या सर्वच प्रकारच्या भिकाऱ्यांचे प्रातिनिधीक चित्रण त्यात आहे. वेगळ्याविषयावरील रंजक माहिती असल्यामुळे पुस्तक पटकन वाचून संपले. त्यानंतर या विषयाचा विसर पडला. "भुसावळमध्ये भिकाऱ्यांची संख्या वाढली' अशी बातमी तीन- एक महिन्यापूर्वी वाचनात आली. या भिकाऱ्यांमध्ये "गर्दूल्ले' जास्त आहेत, असाही संदर्भ होता. पुन्हा विषय स्मृतीबाहेर गेला.
इंटरेटवर विविध विषयांची माहिती शोधण्याची मला सवय आहे. एकेदिवशी सहज भिकारी- भिखारी आणि बेगर्स हे शब्द गुगलवर ऑपरेट करुन माहितीचा शोध घेतला. समोर आलेल्या वास्तवाने उडालोच. प्रवासी आणि पर्यटनाशी संबंधित अनेक वेबसाइटची यादी समोर आली. भिकारी आणि पर्यंटनाचा काय संबंध ? उत्सुकता वाढली. "भारतात पर्यटनाला जाता आहात ?' असा प्रश्‍न करीत पर्यटकांनी कोणत्या गोष्टीची काळजी घ्यावी या विषयी या वेबसाईटवर अनेक टिप्स दिलेल्या होत्या. त्यात भारतातील भिकाऱ्यांपासून सावध ! असा इशारा नोंदलेला होता. इंडिया ट्रॅव्हल टिप्स, वर्ल्ड ऑफ इंडिया आणि इंडिया डॉट ट्रॅव्हल डॉट एजन्ट डॉट कॉमवर या टिप्स वाचता आल्या.या तीनही वेबसाईटवर भिकाऱ्यांपासून सावध राहण्याच्या 5 ते 7 टिप्स होत्या. भारतात अपंग वृद्ध- महिला- मुले भिक मागतात मात्र काही देखावा करतात,उपाशी मुले दाखवून भिक मागणाऱ्या महीला असतात, वाहनातून उतरल्यावर लगोच काही देवू नका तर परत जाताना द्या, मुलांना भिक देतांना बावनासील होवू नको कारण त्यांचे पालकच त्यांना तसे करण्यास सांगतात, मुलांना रोख स्वरुपात भिक देवू नका कारण पालक ती हिसकावून घेतात, काही करावेसे वाटलेच तर स्वयंसेवी संस्थांना मदत करा अशा अनेक टिप्स वाचनात आल्या. भारताच्या पर्यंटन विषयक आणि समाजिक चेहऱ्याचे विद्रुपिकरण या वेबसाईटच्या माध्यममातून कसे होत आहे ? असा प्रश्‍न मनांत निर्माण झाला. त्यावेळी प्रा. श्री. मायी यांच्या पुस्तकातील अनेक निरीक्षणे आठवली. मंदिर, रेल्वेस्थानक, बसस्थानक, बाग- बगिचे अशा सार्वजनिक ठिकाणी दिसणाऱ्या भिकाऱ्यांची गर्दी आठवली. या ठिकाणांशी भारतीय पर्यटनस्थळे थेट संबंधित आहेत, त्यामुळे तेथे दिसणारा भारत वेबसाईटच्या माध्यमातून व्यक्त होतो हे लक्षात आले. कामत डॉट कॉम या ब्लॉगवरही भिकाऱ्यांच्या विषयी अशीच मात्र, भारतीय संस्क
ृतीचे चुकीचे दर्शन घडविणारी माहिती आढळून आली. लेखकाने अत्यंत अर्धवट माहितीवर निरीक्षण नोंदविले आहे. तो म्हणतो, "भारतात भिकारी परंपरेने तयार होतात. हिंदू साधू होण्यासाठी प्रथम भिक मागता आली पाहिजे'. ही माहिती सुद्दा चेहरा बिघडवणारीच वाटते.
भारतातील तपस्वी, विद्वान साधू- महंतांच्या प्रतिमांना छेद देणारे हे लेखन अस्वस्थ करते. भारतीय संस्कृतीत "भिक्षा मागणे' हा सुद्धा एक संस्कार आहे, याची माहिती कोणीतरी असा अर्धवट लेखकांना द्यायला हवी. अध्ययन करणारा ब्रह्मचारी आणि सर्व सुखांकडे पाठ फिरवणारा संन्याशी यांना पोटापुरती भिक्षा मागण्या हक्क संस्कृतीने मान्य केला आहे. गुरूदक्षिणा देण्यासाठी विद्यार्थी, विवाह- यज्ञ किंवा आई- वडील यांच्या पोषणासाठीही भिक्षा मागणे योग्य मानले गेले आहे. आपले दैन्य घालविण्यासाठी राजा किंवा धनिकाकडे याचना करण्यासही संस्कृतीची मान्यता आहे. उपनयन संस्कार (मौंज) करताना आचार्यांनी बटूला ब्रह्मश्‍चर्याविषयी उपदेश केल्यानंतर मातेकडे बटूने भीक्षा मागण्याचाही संस्कार केला जातो. पहिल्या भिक्षेवरही आचार्यांचाच अधिकार असतो. भारतीय संस्कृती दर्शनातील या बाबीही ठळकपणे समोर मांडल्या गेल्या पाहिजेत. याचा अर्थ या प्रथा- परंपरांचे समर्थन करण्याचा हा किंवा त्या योग्यच असल्याचा दावा करण्याचा येथे प्रयत्न नाही हेही येथे स्पष्ट व्हावे. खरेतर भारतीय संस्कृती कोषात "भिक्षा' शब्दाची व्याख्या अत्यंत समर्पक शब्दांत दिली आहे. तेथे तर्कतीर्थ म्हणतात, शरीर धडधाकट असूनही लोकांकडे अन्न, वस्र, पात्र, द्रव्य याची याचना करणे म्हणजे भिक्षा मागणे.
इंटरनेटवर "भिकारी' विषयावरील शोध मोहिमेत आणखी काही वेगळे संदर्भ आढळले. भारताची राजधानी असलेल्या नवीदिल्लीत सन 2007 मध्ये भिकाऱ्यांचे सर्वेक्षण करण्यात आले. तेथे लाखभर भिकारी आढळले. त्यापैकी 4 पोस्ट ग्रॅज्युएट, 6 पदवीधर, 796 बारावी उत्तीर्ण होते. एकूणपैकी 799 पुरूष व 1541 महिला शरीरिकदृष्ट्या पूर्णतः धडधाकट होत्या. यातील काही भिकाऱ्यांचे रोजचे उत्पन्न (कमाई ?)500 रुपये होती.
ंमधील भिकाऱ्यांच्या संदर्भात अशीच एक आकडेवारी लक्षवेधून गेली.सन 2004 मध्ये केलेल्या सर्वेक्षणात नवीदिल्लीत 60 हजार, मुंबईत 3 लाख, कोलकत्यात 75 हजार, बंगळूरमद्ये 56 हजार भिकारी आढळले. हैदराबाद महानगराच्या बाबतीत असा निष्कर्ष आहे की तेथे दर 375 माणसांच्या पाठीमागे एक भिकारी आहे...आता बोला. हीच गंमत मुंबईच्या संदर्भात आहे. 1996 मध्ये तेथे 20 हजार भिकारी होते, आज तेथे 6 लाख भिकारी आहेत. मुंबईत भिकाऱ्यांच्या माध्यमातून वार्षिक किती रुपयांची उलाढाल होते ? याची आकडेवारीही राज्यशासनाने जाहीर केली आहे आणि तो आकडा आहे...180 कोटी मात्र. सांगली पोलिस दरवर्षी भिकाऱ्यांसाठी दिवाळी साजरी करतात.
काही श्रीमंत भिकाऱ्यांच्याही नोंदी आढळल्या. अहमदाबाद येथे एका भिकाऱ्यांच्या मृत्यूनंतर त्याच्या झोपण्याच्या कापडात 44 हजार रुपये कॅश मिळाली होती. तेथेच भद्रकाली मंदिराजवळची एक भिकारी महिला नातवास खर्च करण्यासाठी रोज 50 रुपये देत होती. सांरगपूरच्या एक भिकाऱ्यांने समाजिक कार्यात सव्वालाखांची देणगी दिली होती.
हे सारे संदर्भ वाचताना गंमत वाटत होती. भिकारी हे भारतीय समाजाचा अविभाज्य भाग आहे हे मान्य केले तरी, विदेशी पर्यटकांना त्यांच्या रुपात भारताची ओळख होत आहे या विषयी खेदही वाटत होता. पुन्हा प्रा. श्री. मायी पुस्तकातील एक सूचना मार्गदर्शक वाटली. ती म्हणजे, महानगरांमध्ये भिकाऱ्यांसाठी "बेगर्स होम' उभारले गेले पाहीजेत. जळगावमध्येही या सूचनेवर महापालिका व स्वयंसेवी वेगळा विचार करायला काय हरकत आहे ?

सदराशी संबंध नसलेली गोष्ट

एका आयटी कंपनीच्या समोर भिक मागणाऱ्या भिकाऱ्यास त्या कंपनीतील बडा अधिकारी 50 रुपयांची नोट देत असे. भिकारी त्याला हसून नमस्कार करायचा. काही महिन्यांनी त्या अधिकाऱ्यांने 50 ऐवजी 20 ची नोट देणे सुरू केले. भिकारी ती नोट घ्यायचा आणि केवळ स्मित करायचा. पुन्हा काही महिन्यांनी त्या अधिकाऱ्यांने त्या भिकाऱ्यास 10 रुपयांची नोट देणे सुरू केले. त्यावर निर्विकारपणे भिकारी त्या अधिकाऱ्यांस म्हणाला, "महाशय आपण काही अडचणीत आङात का ? आपण मला कमी रकमेची नोट देत आहात ?' तो अधिकारी म्हणाला होय, "पूर्वी माजे खर्च कमी होते. आता, माझा मोठा मुलगा उच्च शिक्षणाला गेला म्हणून मी 50 ऐवजी 20 रुपये देत होतो. त्यानंतर मुलगी कॉंलेजात गेली. तीचा खर्च वाढला म्हणून मी तुला 10 रुपये देत आहे' तो भिकारी निर्विकारपणे म्हणाला, "तुम्हाला अजून तिसरे मूल आहे का ?' अधिकारी म्हणाला, "होय. एक लहान मुलगा आहे.' त्यावर भिकारी परखडपणे म्हणाला, "महाशय, या तिसऱ्या मुलाचे शिक्षण मला देण्याच्या रकमेतून कृपया करु नका'.

original at -http://marathiblogs.net/node/44893


रानात, फुलात; कोकणच्या गावात!



हातात रिझव्हेर्शन, तारांकित हॉटेलातील बुकिंग, ठरीव न्याहरी-जेवण आणि प्रेक्षणीय स्थळे किंवा रिझॉर्टमधील तेच वातावरण...यांच्या बाहेर पडून स्वत: सहल आखून कोकणासारख्या हिरव्यागार प्रांतात जाण्याचा अनुभव घ्यायला हवा. तिथल्या एखाद्या छोट्याशा गावात, निसर्गाच्या सान्निध्यात मुलांना काही दिवस राहायला मिळणे आणि सर्वांनी मिळून समूहजीवनाचा अनुभव घेणे, यातली मजा काही औरच...

...........

मे महिन्याच्या भल्या मोठ्या सुटीत करायचं काय, या मुलांना आणि त्यांच्या पालकांना पडणारा प्रश्ान्च असतो. दहावीत आणि बारावीत जाणाऱ्या मुलांना तर आता मे महिन्याची सुटी असते, असे आपण म्हणतच नाही. त्यांचा लगेच अभ्यास सुरूही होतो. पण इतर मुलांपैकी काही जातात छंद वर्गात. काही सचिन तेंडुलकरच्या फोटोच्या पाया पडून, कीटचे ओझे सांभाळत मैदानावर जातात. काही लिटल चॅम्प होण्याचे स्वप्न उराशी बाळगून गाणे शिकायला जातील. अर्थात, हे सारे न करणारीही हजारो मुले असतातच.

काही कुटुंबांमध्ये आता विचार सुरू होईल बाहेरगावी जाण्याचा. एखाद्या सहल कंपनीमध्ये भरभक्कम पैसे मोजून आठ दिवसांसाठी जायचे. ते ही घरातल्या तिघांनी किंवा चौघांनी. मात्र, अशा सहलींमध्ये जी प्रेक्षणीय स्थळे मोठ्या माणसांना बघायची असतात, ती पाहण्यात लहानग्यांना अजिबातच रस नसतो. त्यामुळे त्यांची रड, कंटाळा, धुसफूस सांभाळत; कधी त्यांना रागावत तर कधी प्रेमाने समजावत सगळ्यांबरोबर दिवसभर फिरत राहायचे आणि रात्री तारांकित हॉटेलात डोळे मिटत असताना शिरायचे. लहानग्यांचे आणि आपले कपडे जमेल तसे पिळून टाकायचे. मोबाईलवर सकाळी सहाचा गजर लावून झोपायचे. आणि खर्च बराच झाला पण आराम आणि पाहणे खूप झाले, असे म्हणत स्वत:चीच समजूत काढत परत मुंबई गाठायची. दुसऱ्या दिवशी धावपळ सुरू.

खरे पाहता आपल्याला आवश्यकता असते सैलसर व स्वच्छंदी जीवन जगण्याची. काटेकोर धावपळीचा, रोजच्या पोशाखी वागण्याचा आणि रोज आपण खात असलेल्या खाद्यपदार्थांचा कंटाळा घालवण्याची.

थोडा विचार केला तर यातून आपल्याला चांगला मार्ग काढता येईल. आपल्याला आणि मुलांना मनमोकळे व मनसोक्त राहता येईल. घरी असणाऱ्या महिलांनी मुलांचे बाबा सोबत आले तर त्यांच्यासहित किंवा त्यांना जमणार नसले तर त्यांच्याशिवाय, आपल्या समवयस्क मैत्रिणींचा छानछोटा ग्रुप बनवावा. हा गुप तीनचार जणींच्यावर मात्र नसावा. मग कोकणातल्या एखाद्या खेड्यातले घर १५-२० दिवसांसाठी भाड्याने मिळवावे. आसपास थोडी चौकशी केली तर कोकणातल्या कितीतरी गावांमधली अशी घरे उपलब्ध होऊ शकतील. कोकणाचा हा सारा परिसर अत्यंत रम्य तर आहेच पण तो अत्यंत सुरक्षित प्रदेश आहे. कोणत्याही गावात कोणत्याही वेळी तुम्ही बिनघोर राहू शकता. फिरू शकता. या गावांमधले गावकरी काही त्रास तर देणार नाहीतच उलट जमेल तेवढी मदत करतील.

कोकणात आज बऱ्याच सोयी आहेत. तालुक्यांच्या ठिकाणी सुपर माकेर्टपासून-बँकापर्यंत सगळ्या सोयीसुविधा आहेत. सर्व गावांमध्ये पिशवीतून दूध मिळते. बहुतेक गावांमध्ये आता नळपाणी योजना आहेत. तिथे गॅस सिलेंडरही सहज मिळतो. दूरध्वनी सेवा खेडोपाडी पोहोचली आहे. गरज पडल्यास, डॉक्टरही आहेत. पण त्यांची गरजच भासणार नाही. मुंबईहून नेलेली औषधेही न वापरता परत आणावी लागतील.

परीटघडीची बांधिलकी नसल्यामुळे मोकळा-चाकळा वावर व मुलांचे उघड्या अंगाने दिवसभर झाडामाडात हुंदडणे, गुराढोरांचा आणि झाडाझुडपांचा अनोखा प्रेमळ सहवास हे सारे वातावरण मुलांना अनुभवू दे. इन्फेक्शन आणि परीटघडीचे मॅनर्स यांचा मुळीच बाऊ करू नका. सगळ्या भीती विसरून मस्त राहात येईल. मैत्रिणी मैत्रिणी मिळून रोज नवनवीन पदार्थ करून मनसोक्त खाता येतील. अशा वातावरणात मुले न कंटाळता एकमेकांमध्ये मिळून-मिसळून दिवसभर खेळत राहतील. दिवसभर खेळून दमून त्यांना रात्री मस्त झोप येईल. सकाळी उठून ती पाहतील तर एखादी मनीमाऊ त्यांच्या अंथरूणात येऊन झोपलेली असेल. तुम्हीही पहाटे अंगणात येऊन बसलात तर तुम्हाला समाधी लागल्याचा अनुभव आल्याशिवाय राहणार नाही.

कोकणात जायला आता भरपूर वाहतुकीच्या सोयी सहज उपलब्ध आहेत. रेल्वे आहे, खासगी बस आहेत, एसटी आहेत. आराम बसमधील प्रवासापेक्षा, साध्या एसटीतून अवश्य प्रवास करून बघा. एसटीचे जाळे आता अगदी छोट्या गावांपर्यंत पोहोचले आहे. तसेच, एसटीच्या वेळापत्रकातही खूप नियमितता आली आहे. एसटीतून प्रवास म्हणजे समाजातील सर्व प्रकारच्या लोकांशी प्रत्यक्ष संपर्क. या अशा संपर्काचा अनुभव मुलांना जरूर घेऊ द्यावा. त्यातून त्यांच्या संवेदना अधिक जाग्या होतील. कदाचित्, न दिसलेले जगही त्यांना या प्रवासात दिसण्याची शक्यता आहे.

असे हे मुक्त प्रवासाचे १५-२० दिवस तुम्हाला वर्षभर पुरेल एवढी ऊर्जा देतील. तुम्हाला व तुमच्या मुलांना हे निसर्गाच्या सहवासातले अनुभव नक्कीच समृद्ध करतील. तुमच्या माणूसपणाला नवा आराम मिळेल. एकमेकांच्या आवडीनिवडी लक्षात घेऊन, आपसात देवघेव करून, लहानसहान श्रम एकत्रित करून मुलांवर एक वेगळाच संस्कार नकळत झाल्याशिवाय राहणार नाही. आपल्या राज्यातील एक प्रदेश त्यांना 'आतून' दिसेल, हा आणखी एक फायदा. समूहजीवनाचा एक नवा अनुभव आल्याशिवाय राहणार नाही.

साऱ्या गोष्टी तयार आणि जिथल्या तिथे मिळण्याऐवजी स्वत: आखणी करून अमलात आणण्यातही मजा असते. ती मजा अशा ट्रिपमुळे अनुभवता येईल. मग विचार कसला करताय? जमवा मित्रमैत्रिणी आणि मुलांना घेऊन स्वत: सफरीवर निघा!

रिफ्रेश व्हायचंय?





वीकएण्डला अनेक जण छोट्या ट्रिप आखत असतात. त्यासाठी मुंबईपासून जवळ असलेल्या ठिकाणांना प्राधान्य दिलं जातं. बरेचदा अशा ट्रिप एखाद्या बीचवर किंवा रिसॉर्टवर काढल्या जातात. पण एखाद्या धरणावर जाण्याचा बेत तुम्ही कधी बनवला आहे का? मुंबईपासून जवळच असलेल्या बदलापूरमध्ये एक सोडून दोन धरणं आहेत. बारवी डॅम आणि चिखळोली डॅम. या दोन्ही धरणांचा परिसर रम्य आणि शांत असल्याने एका दिवसात रिफ्रेश होण्यासाठी इथे जायला काहीच हरकत नाही.

.........

दशकभरापूवीर् ठाणे जिल्ह्यातलं देखणं आणि नेटकं गाव म्हणून बदलापूर प्रसिद्ध होतं. आता मात्र बदलापूरने कात टाकून शहरी रूप धारण केलं आहे. बदलापूर, अंबरनाथ ह्मद्ध गावांवर मुंबईचा प्रभाव पडल्यामुळे त्यांचा विकास झपाट्याने झाला. बदलापूर आता शहर बनलं असलं तरी त्याने आपल्या 'गावपणा'च्या खुणा जपल्या आहेत. स्टेशनपासून आत गेल्यावर हे गाव एकेकाळी किती टुमदार, रमणीय असेल याची साक्ष मिळते. या परिसरात पाहण्यासारखी बरीच ठिकाणं आहेत. विशेषत: एक दिवसाच्या सहलीसाठी ही ठिकाणं चांगली आहेत. बदलापूरच्या बारवी डॅमवर हौशी पर्यटकांची बरीच गदीर् दिसते.

बारवी हे उल्हास नदीवर बांधलेलं धरण आहे. इथलं निसर्गसौंदर्य आपल्याला मोहीत करतं. सध्या सुरक्षेच्या कारणास्तव धरणावर सगळीचकडे फिरता येत नाही. बारवी डॅमच्या परिसरात अनेक रिसॉर्ट्स आहेत. त्यामुळे पर्यटकांच्या निवास-भोजनाची व्यवस्था होतेे. बदलापूर स्टेशनपासून सुमारे १६ किलोमीटर अंतरावर हा डॅम आहे. हा सारा परिसर घनदाट वृक्षांनी वेढलेला आहे. उल्हास नदीच्या दोन्ही किनाऱ्यांना जोडणारा एक पूल आहे. मात्र इथे पुलाखाली जाण्यास मनाई आहे.

सुट्टी असते तेव्हा अनेक जण एखाद्या बीचवर जाणं पसंत करतात. अलिबागचे सर्वच समुदकिनारे सुट्टीच्या दिवशी गजबजलेले असतात. परंतु थोडा बदल म्हणून एखाद्या वीकएण्डला मुंबईपासून जवळच असलेल्या बारवी डॅमला जायला काही हरकत नाही.

बदलापूरातलं आणखी एक धरण प्रेक्षणीय आहे. ते म्हणजे चिखळोली धरण. बारवी डॅमच्या तुलनेत कमी प्रसिद्ध असलेलं हे धरण बदलापूरच्या पूवेर्ला आहे. बदलापूर स्टेशनपासून सुमार सात ते आठ किलोमीटर अंतरावर हे धरण आहे. हे धरण छोटेखानी असलं तरी आजूबाजूचा परिसर मात्र प्रेक्षणीय आहे. बदलापूर स्टेशनपासून थेट रिक्षेनेही इथपर्यंत येता येतं. बारवी डॅम इतकी सुरक्षाव्यवस्था इथे नसली तरी हे धरण तुलनेत कमी धोकादायक आहे. तरीही पर्यटकांनी अगोदर माहिती घेतल्याशिवाय पाण्यात उतरण्याचा धोका पत्करू नये. चिखळोली धरणाचा परिसर अतिशय शांत आहे. इथे जाण्याची खरी मजा पावसाळ्यात आहे. कारण पावसाळामुळे फुललेली इथली हिरवळ भुरळ पाडते. पण पावसाळ्याखेरीज एरव्ही कुठलाही मोसमात चिखळोली धरणाला भेट द्यायला हरकत नाही कारण शांत ठिकाणी थोडा वेळ घालावायची इच्छा असणाऱ्यांना यासारखं दुसरं ठिकाण सापडणार नाही.

बारवी किंवा चिखळोली धरणावर जायचा बेत आखत असल्यास काही गोष्टी ध्यानात ठेवा:

* बारवी डॅमला जाण्यासाठी बदलापूर स्टेशनपासून बससेवा उपलब्ध आहे.

* चिखळोली डॅमला रिक्षाने जात येत असलं तरी रिक्षा परतीसाठी थांबणारी असावी. कारण परत जाण्यासाठी इथे कुठलंही वाहन उपलब्ध नाही.

* स्वत:चं वाहन असल्यास सहलीचा आनंद अधिक मोकळेपणाने लुटता येईल.

विक्रमगडचा निसर्ग खुणावतो!


तुम्हाला स्वत:चा शोध घ्यायचाय. रोजच्या धावपळीतून मस्त वीकेण्ड एन्जॉय करायचाय. नाहीतर समस्त जुन्या मित्रमंडळींच
ा झकास ट्रेकिंगचा प्लॅन आहे. शहराच्या धकाधकीपासून दूर कुठेतरी रम्य ठिकाणी जायचं असेल, तर मग तुम्ही नक्की विक्रमगडचा रस्ता धरा, असा सल्ला दिलाय ' बिनधास्त' शर्वरी जमेनिस हिने.

.......

ठाणे-जव्हार रस्त्यावर असलेला विक्रमगड हे माझं खास आवडतं ठिकाण. चित्रपटाच्या शूटिंगच्या निमित्ताने आम्ही कलाकार वेगवेगळ्या साइट, लोकेशन्स आणि शहरांमधे फिरत असतो. या ठिकाणांचं खास वेगळेपण, त्यांची वेगळी अशी ओळख, तिथे प्रसिद्ध असलेल्या वस्तू आणि पदार्थ यांचा शोध घेऊन हमखास त्यांना भेटी देणं ठरलेलंच. त्या त्या दिवसांपुरतं आम्ही तिथलं आयुष्य जगतो. पण शूटिंगमुळे हा नित्याचाच भाग झाला आहे. त्यामुळेच खास धमाल किंवा वेगळं काही अनुभवायचं असेल, मस्त फिरायचं असेल तर हटके अशा विक्रमगडला भेट द्यायलाच हवी.

ट्रेकिंगसाठी निघायचं म्हणजे खास आकर्षण असलेल्या रिव्हर क्रॉसिंग, जंगल सफारी, रॉक क्लायम्बिंग यांचाही आनंद इथे उपभोगता येतो. शिवाय इथली शांतता, निसर्गरम्य परिसर, नदीचे निर्मळ-स्वच्छ पाणी, शुद्ध हवा अगदी मन मोहून टाकणारी आहे. विक्रमगडावरील एका आदिवासी पाड्यावर दिवेकरांचं मस्त रिसॉर्ट आहे. खास ग्रामीण टच असलेल्या या रिसॉर्टवर धम्माल आणि मनमुराद जगण्याचा आनंद लुटता येतो. पण शांत आणि मोकळ्या वातावरणामुळे निसर्गाच्या अधिक जवळ गेल्याचं समाधान मिळतं. या रिसॉर्टवर राहण्याची उत्तम सोय तर आहेच शिवाय अस्सल ग्रामीण टच असलेलं रुचकर जेवणही उपलब्ध आहे. या मोकळ्या वातावरणात आपल्याला मस्त सपाटून भूक लागते आणि या अस्सल चवीच्या जेवणाने वेगळंच समाधान मिळतं. मुंबईपासून अगदी जवळ शिवाय निसर्गाच्या सान्निध्यात एक-दोन दिवस राहून पुन्हा ताजं तवानंही होऊ शकता येतं. मग कधी निघताय 'भटकंती'साठी विक्रमगडला? इथला शांत परिसर अनुभवायला. स्वत:चा शोध घ्यायला?

- शब्दांकन : विनय उपासनी

माहुलीचा इतिहास जागवताना


माहुली किल्ल्याचा स्वराज्यात समावेश झाल्याला ३५१ वर्षं पूर्ण झाल्याबद्दल माहुली निसर्ग मंडळातफेर् शहापूर, तसंच
माहुलीच्या परिसरात 'माहुली महोत्सव' आयोजित केला होता. त्यानिमित्त माहुलीच्या इतिहासाला दिलेला हा उजळा.

......

महाराष्ट्रातल्या इतर किल्ल्यांप्रमाणेच माहुली इतिहासाबद्दल फारसा बोलत नाही. भंडारगडावरील चोर दरवाजातल्या शिलालेखाव्यतिरिक्त कुठल्याही लिखित नोंदी माहुलीवर नाहीत. परंतु त्याचा ज्ञात इतिहास खरोखरच अभिमानास्पद आहे. या किल्ल्याचं बांधकाम शिलाहारांच्या काळात झालं, असा उल्लेख ठाणे जिल्हा गॅझेटिअरमधे सापडतो. परंतु माहुली किल्ल्याचाच एक भाग असलेल्या भंडारदुर्गावरील पाण्याच्या टाक्यावरून तो शिलाहारांपूवीर्च्या काळातही अस्तित्वात असावा. याला प्रमाण म्हणजे या पाण्याच्या टाक्याची बांधणी. अशी बांधकामं लेण्यांचा काळ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सातवाहन कालखंडात केली जात.

किल्ल्याचा ठोस पुराव्यांवर आधारित इतिहास १४८५ पासून सुरू होतो. १४८५ मधे निजामशाहीचा संस्थापक मलिक अहमदने कोकणातील इतर किल्ल्यांबरोबरच माहुलीचा किल्लाही ताब्यात घेतला. १६३५ मधे संगमनेर जवळच्या पेमगिरी किल्ल्यावर शहाजी राजांनी निजामाचा शेवटचा वंशज मूतीर्जा याला निजामशाह म्हणून घोषित केलं. निजामशाही संपवण्यासाठी १६३५ मधे शाहजहान स्वत: महाराष्ट्रात उतरला होता. विजापूरच्या आदिलशहाला त्याने आपल्या बाजूला वळवलं. निजामशाही वाचवण्याच्या धामधुमीत पेमगिरी-जीवधनचा किल्ला सोडून शहाजीराजांनी लहानगा शिवबा आणि जिजाऊंसह माहुलीचा आश्रय घेतला. १९६३ मधे मुघल सेनापती खानजमान आणि रणदुल्लाखान यांनी माहुलीला वेढा दिला आणि शहाजीराजे आणि निजामशहाची कोंडी केली. ऑक्टोबर १६३६ तहामधे शहाजीराजांना माहुलीचा किल्ला खानजमान आणि रणदुल्लाखानाकडे सुपूर्द करावा लागला. निजामशाही बुडाली आणि त्याचबरोबर शहाजीराजांचे मराठेशाहीचं स्वप्न भंगलं. त्यांना आदिलशहाची चाकरी स्वीकारणं भाग पडलं. शहाजीराजांची बंगळूरला रवानगी करण्यात आली. त्यानंतर माहुलीचा किल्ला कधी मोगलांकडे तर कधी मराठ्यांकडे ये-जा करत राहिला. १६५७ मधे कल्याण-भिवंडी फत्ते करून स्वराजाच्या आरमाराची मुहूर्तमेढ रोवून शिवाजी महाराज जातीने माहुलीवर चालून गेले. ८ जानेवारी १६५८ मधे शिवाजी महाराजांनी तो मोगलांकडून जिंकला आणि शहाजीराजांच्या पराभवाचे उट्टं फेडलं. पुढील केवळ आठ वर्षं माहुली स्वराज्यात होता. १६६५ मधे मिर्झाराजे जयसिंग आणि दिलेरखानाबरोबर झालेल्या पुरंदरच्या तहात माहुलीचा ताबा पुन्हा मोगलांकडे गेला.

शिवाजी महाराजांची आग्य्राहून सुटका होताच उत्तर कोकणाच्या मोहिमेदरम्यान शिवाजी महाराजांनी १५०० मावळ्यांसह जातीने रात्री अचानक छापा घालून माहुलीचा किल्ला काबीज करण्याचा प्रयत्न केला. पण या मोहिमेत १००० मराठे कापले गेले. फारच जबर फटका महाराजांना बसला. मात्र महाराजांनी लवकरच संधी साधली. मोरोपंत पिंगळ्यांनी माहुलीस वेढा दिला. सुमारे दोन महिने माहुलीस वेढा टाकून हल्ले सुरू होते. १६ जून १६७० रोजी निकाराचा एल्गार झाला आणि माहुलीवर पुन्हा एकदा मराठ्यांचे निशाण चढले, असं या लढाईचं वर्णन शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांनी केलं आहे. तेव्हापासून १८१७ मधील इंग्रज आणि पेशवे यांच्यातल्या पुणे तहापर्यंत जवळजवळ दीडशे वर्षं या किल्ल्याचं स्वामित्व मराठ्यांकडे होतं. एक अभेद्य तसंच महाभयंकर किल्ला (स्नश्ाह्मद्वद्बस्त्रड्डड्ढद्यद्ग स्नश्ाह्मह्ल) म्हणून या किल्ल्याचं वर्णन ठाणे जिल्हा गॅझेटियरमधे सापडतं.

१८१८ मधे कॅप्टन डिकन्सन नामक इंग्रज अधिकारी माहुलीवर आला. त्याने स्वत: फिरून माहुलीचं सवेर्क्षण केलं. सन १८१८ मधील कॅप्टन डिकिन्सनच्या भेटीपर्यंत गडावरील काही वास्तू शाबूत होत्या. मात्र १८६२ च्या आसपास किल्ल्याचं आणखी नुकसान झालं आणि किल्ल्यावरची तटबंदी जवळपास नष्ट झाली. माहुलीच्या दक्षिणेकडील एका घळीत एक दरीच्या तोंडाशी एक वैशिष्ट्यपूर्ण तुरुंग असल्याचं गॅझेटिअरमधे म्हटलं आहे.

शिवाजी महाराजांच्या ३०० व्या पुण्यतिथीनिमित्त दिवंगत पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या उपस्थित रायगडावर झालेल्या सोहळ्यात महाराष्ट्रातील अनेक पवित्र तीर्थक्षेत्रं आणि किल्ल्यांवरील पाण्याने महाराजांच्या समाधीला अभिषेक करण्यात आला होता. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील ३०० हून अधिक तीर्थक्षेत्रं आणि किल्ल्यांवरून आणलेल्या पाण्याचे कुंभ रायगडावर आणले होते. राजांच्या समाधीवर अभिषिक्त होण्याचा पहिला मान होता तुळजापूरहून आणलेल्या जलकुंभाचा. त्यानंतर शिवनेरी आणि त्यानंतर महाराजांचं बालपण पाहिलेल्या माहुलीच्या गडगंगेला तिसरं मानाचं पान देऊन गौरवण्यात आलं होतं.

माहुलीवर आढळणारे घरांचे प्रशस्त चौथरे, तलाव तसंच मानवी वस्तीच्या खाणखुणा पाहत एकेकाळी या किल्ल्यावर प्रचंड वस्ती असावी. मात्र आता किल्ल्यावर उरले आहेत काही वीरगळ, भग्न तटबंदी, दगडधोंडे, चौथरे आणि मानवी वस्तीच्या खुणा दर्शवणारी आंबा, फणस, बकुळीची झाडं...

- रवींद पानसरे



original at -
http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/4048980.cms


शांततेचा निवारा



-


शांत आणि खळखळ नाद करत जाणारी नदी हे खडावलीचं मुख्य आकर्षण. नदीचा मंद खळखळाट आणि गार वाऱ्याची झुळूक मनाला उभारी देते. ठाण्यापासून एक तासाच्या अंतरावर असलेलं 'खडावली' गाव रूटीनला कंटाळलेल्या मंडळींसाठी चांगला पिकनिक स्पॉट आहे.
.......

' जिथे शांतता निवारा शोधत येते

अशा एका तळ्याकाठी बसावेसे वाटते! '

कवी अनिल यांच्या या ओळींचा प्रत्यक्ष अनुभव घ्यायचा असेल तर ठाणे जिल्ह्यातल्या खडावलीला एकदा भेट द्यायलाच हवी. गावातून वाहणारी नदी हे इथलं मुख्य आकर्षण. मंद खळखळाट करत वाहणाऱ्या नदीचं चमचमतं पात्र पाहिलं की एखादी अल्लड लहानगी दुडूदुडू धावत, डोळे मिचकावत आपल्याला बोलावते आहे असं वाटतं. नदीच्या किनारी वाऱ्याची थंड झुळूक स्पर्शून जाते. तिचा स्पर्श आणि नदीचा सूरमयी नाद आपल्याला आकषिर्त करतात. एका क्षणात मनाला आलेला थकवा निघून जातो. मनावर साचलेली धूळ उडून जाते. निसर्गाच्या जादूने आपण मंत्रमुग्ध होतो... रोज ट्रेन पकडायची, गदीर्चे धक्के सहन करायचे... या रूटीनला कंटाळलेल्या मंडळींसाठी 'रिचार्ज' होण्यासाठी खडावली हे उत्तम ठिकाण आहे.

पूवीर् या गावात खूप खड्डे होते म्हणून त्याला 'खड्डावली' म्हणू लागले. नंतर ते 'खडावली' झाल्याचं सांगितलं जातं. इथल्या नदीत पोहण्याचा आनंद घेण्यासाठी दूरहून पर्यटक खडावलीला भेट देतात. नदीचा किनारा सोपा असून त्याची रचना सपाट खडकांची आहे. ही नदी शांत आणि उथळ असल्याने मुलांपासून, महिला आणि वृद्ध नदीत डुंबण्याचा आनंद घेऊ शकतात. तसंच किनाऱ्यावर चहा, भजी आणि वडापाव यांची छोटी टपरीवजा दुकानंही आहेत. पाण्यात मनसोक्त डंुबून हुडहुडी भरली की गरमागरम भजी खाण्याचा आणि सोबत कटिंग चहा पिण्याचा आनंद काही निराळाच असतो.

शांत वाहणाऱ्या नदीच्या किनारी स्वामी समर्थांचा सुंदर मठ आहे. इथल्या शांततेवर एक अध्यात्मिक अस्तर असल्यासारखं वाटतं. मठातला गारवा शांतता अधिक गहिरी करतो. टिटवाळ्याच्या गणपतीचं दर्शन घेतल्यावर अनेक भाविक या मठात येतात. भाविकांना मठात ध्यानधारणा किंवा नामस्मरणही करता येतं. खडावलीच्या वेशीवरच हनुमानाचं मंदिर आहे. हनुमान हे शक्तीचं दैवत असल्याने गावाचं रक्षण करण्यासाठी वेशीवरच हे मंदिर बांधण्यात आल्याचं सांगितलं जातं. या परिसरात दत्ताचंही छोटसं, सुंदर मंदिर आहे. हे मंदिरही पाहण्यासारखं आहे.

कसलेल्या गायकाने शांत, मंद गाणं गावं तशी खडावलीची नदी मंजुळ नाद करत वाहत असते... सगळ्या चिंता नदीच्या पात्रात काही वेळापुरत्या सोडून एखाद्या ध्यानस्थ ऋषीप्रमाणे किनाऱ्यावर बसून राहावं... शांततेचा उपभोग घेत!

....... .........

* इथे कसं पोहोचाल?

खडावली हे मध्य रेल्वेवरचं कसाऱ्याकडे जाताना टिटवाळ्याच्या पुढचं स्टेशन. इथे कसारा किंवा आसनगाव ट्रेनने जाता येतं. वाहनाने जायचं झाल्यास कल्याणहून टिटवाळ्याला जाणाऱ्या रस्त्यावरून खडावलीला जाता येतं.

* काय काळजी घ्याल?

नदीचं पात्र किनाऱ्याजवळ शांत आणि उथळ असलं तरी काही ठिकाणी ते खोल आणि धोकादायक आहे. त्यामुळे पोहण्यासाठी जास्त पुढे जाऊ नये. जायचं झाल्यास तिथल्या जाणकार स्थानिकांचा सल्ला घ्यावा. नदीच्या पाण्याचा आनंद घेताना तिथेच कचरा करू नका. पर्यावरणाचा समतोल राखणं हे आपलं कर्तव्य आहे.

AYUSHonline

AYUSH  adivasi yuva shakti  www.adiyuva.in AYUSH  adivasi yuva shakti  www.adiyuva.in AYUSH  adivasi yuva shakti  www.adiyuva.in AYUSH  adivasi yuva shakti  www.adiyuva.in AYUSH  adivasi yuva shakti  www.adiyuva.in AYUSH | adivasi yuva shakti | www.adiyuva.in AYUSH | adivasi yuva shakti | www.adiyuva.in AYUSH | adivasi yuva shakti | www.adiyuva.in AYUSH | adivasi yuva shakti | www.adiyuva.in AYUSH | adivasi yuva shakti | www.adiyuva.in AYUSH | adivasi yuva shakti | www.adiyuva.in AYUSH | adivasi yuva shakti | www.adiyuva.in AYUSH | adivasi yuva shakti | www.adiyuva.in AYUSH | adivasi yuva shakti | www.adiyuva.in

AYUSH - warli artsists at "adishilp - 2009" @hyderabad

updation in progress!

our blogs

Loading...

apali prerana